हिंजवडीतील सॉफ्टवेअर अभियंत्याची आत्महत्या; सुसाईड नोटनंतर आयटी कंपनीतील छळप्रकरण उघड
पुणे (Hinjawadi IT Hub) : पुण्यातील हिंजवडी येथील आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या ४८ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याने २ जून रोजी आत्महत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तिघांविरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला आहे. वरिष्ठ सहकाऱ्यांकडून तसेच एका मित्राकडून होत असलेल्या सततच्या मानसिक छळामुळे अभियंत्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) सुधाकर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित अभय ब्रह्मे असे मृत अभियंत्याचे नाव असून त्यांनी जून महिन्यात आत्महत्या केली. त्यांच्या सविस्तर सुसाईड नोटच्या आधारे दोन कंपनी कर्मचाऱ्यांसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोटमध्ये त्यांनी वारंवार अपमान आणि मानसिक छळ सहन करावा लागल्याचा उल्लेख केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
भोसरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. अमित यांचा १९ वर्षीय मुलगा अनिश ब्रह्मे याने ९ जून रोजी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, अमित ब्रह्मे एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत होते. २ जून रोजी त्यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. सुरुवातीला आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले नव्हते.
मात्र घटनास्थळावरून दोन पानी सुसाईड नोट सापडल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले. या नोटमध्ये अमित ब्रह्मे यांनी आपल्या दोन वरिष्ठ सहकाऱ्यांवर, अर्चना आणि शाश्वती यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
कार्यस्थळी मानसिक छळाचे गंभीर आरोप
सुसाईड नोटमध्ये नमूद केल्याप्रमाणे, ब्रह्मे यांनी दीर्घकाळ कार्यस्थळी मानसिक छळ सहन केल्याचा दावा केला आहे. त्यांना अपेक्षित प्रकल्पांपासून दूर ठेवण्यात आले, तर जाणूनबुजून अत्यंत कठीण आणि तणावपूर्ण कामे सोपवण्यात आल्याचे त्यांनी लिहिले आहे. याशिवाय, इतर कर्मचाऱ्यांसमोर वारंवार अपमान करण्यात येत होता आणि नोकरी सोडण्यासाठी दबाव टाकला जात होता, असेही त्यांनी नमूद केले आहे. या वागणुकीमुळे आपल्यावर गंभीर मानसिक परिणाम झाल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
याशिवाय, इतर कर्मचाऱ्यांसमोर वारंवार अपमानित करण्यात येत होते, नोकरी सोडण्याचा दबाव टाकला जात होता आणि "तुम्ही नोकरी सोडून द्या, तुमचा फीडबॅक खराब करू" अशा प्रकारच्या धमक्याही दिल्या जात असल्याचा उल्लेख त्यांनी नोटमध्ये केला आहे. अमित यांनी असेही नमूद केले की, त्यांची पत्नी गंभीर आजाराने त्रस्त असतानाही त्यांना अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. तसेच वडिलांच्या निधनावेळी सुट्टीसाठी विनंती करूनही टाळाटाळ करण्यात आली आणि त्या काळातही मानसिक त्रास सहन करावा लागला.
मित्राविरोधातही गंभीर आरोप
या प्रकरणाला कौटुंबिक वादाचीही पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. आरोपी विनोद पालीचा आणि अमित ब्रह्मे हे अनेक वर्षांपासूनचे मित्र होते. मात्र, विनोद यांच्या पत्नी फिलिपिन्सला परत जाण्यास अमित जबाबदार असल्याचा गैरसमज निर्माण झाला होता.
या गैरसमजातून विनोद पालीचा यांनी अमित यांच्याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात खोट्या तक्रारी दाखल केल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर चोरीचे आरोप करण्यात आले आणि कंपनी व्यवस्थापनाला ई-मेल पाठवून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
अमित यांनी आपल्या नोटमध्ये लिहिले आहे की, सततचा अपमान, मानसिक छळ, बदनामी आणि तणाव यामुळे ते पूर्णपणे खचून गेले होते. या सर्व घटनांमुळे मानसिकदृष्ट्या थकून गेल्यानेच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या प्रकरणाला कौटुंबिक वादाचीही पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. आरोपी विनोद पालीचा आणि अमित ब्रह्मे हे अनेक वर्षांपासूनचे मित्र होते. मात्र, विनोद यांच्या पत्नी फिलिपिन्सला परत जाण्यास अमित जबाबदार असल्याचा गैरसमज निर्माण झाला होता.
या गैरसमजातून विनोद पालीचा यांनी अमित यांच्याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात खोट्या तक्रारी दाखल केल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर चोरीचे आरोप करण्यात आले आणि कंपनी व्यवस्थापनाला ई-मेल पाठवून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
अमित यांनी आपल्या नोटमध्ये लिहिले आहे की, सततचा अपमान, मानसिक छळ, बदनामी आणि तणाव यामुळे ते पूर्णपणे खचून गेले होते. या सर्व घटनांमुळे मानसिकदृष्ट्या थकून गेल्यानेच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
आत्महत्येनंतर गुन्हा दाखल
या सर्व मानसिक त्रासाला कंटाळून अमित ब्रह्मे यांनी २ जून रोजी दुपारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी दोन पानी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या नोटमध्ये अर्चना, शाश्वती आणि विनोद पालीचा यांच्याकडून झालेल्या कथित छळाचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे.
कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर आणि सुसाईड नोटमधील माहितीच्या आधारे भोसरी पोलिसांनी अर्चना, शाश्वती आणि विनोद पालीचा यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून सध्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात असून सर्व पैलूंची तपासणी सुरू आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांनी दिली.
आयटी क्षेत्रातील मानसिक तणावाचा मुद्दा पुन्हा चर्चेत
या घटनेमुळे आयटी क्षेत्रातील वाढता मानसिक तणाव, कार्यस्थळी होणारा छळ, कार्यालयीन राजकारण आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उच्च वेतन आणि आकर्षक करिअर संधींसाठी ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्रात अनेक कर्मचारी तीव्र स्पर्धा, कामगिरीचा दबाव आणि नोकरीतील असुरक्षिततेचा सामना करत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासाकडे आयटी क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले असून पुढील चौकशीतून नेमके वास्तव काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.