Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > अध्यात्म

नर्सी नामदेव यात्रा आरंभ

Saint Namdev Yatra: संत नामदेवांची यात्रा: पन्नास गावांतील दिंड्या होणार दाखल

नर्सी नामदेव में 19 मार्च से तीन दिन की संत नामदेव यात्रा शुरू हो रही है, जिसमें लाखों भाविक सम्मिलित होंगे।


saint namdev yatra संत नामदेवांची यात्रा पन्नास गावांतील दिंड्या होणार दाखल

नर्सी नामदेव येथे गुढीपाडव्या पासून नामाचा गजर

हिंगोली (Saint Namdev Yatra) : संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पापमोचनी एकादशीच्या दिवशी १९ मार्च गुरुवार पासून तीनदिवसीय यात्रेला सुरवात होत आहे. यात्रेची तयारी पूर्ण झाली असून लाखो भाविक संत नामदेव महाराजांच्या समाधी दर्शनसाठी दाखल होतील. परिसरातील चाळीस ते पन्नास गावातील दिंड्या यात्रेत दाखल होणार आहेत. हरि नामाच्या गजराने हे गाव तीन दिवस भक्तिरसात दंग होईल.

संत नामदेव महाराज (Saint Namdev Yatra) मंदिर संस्थानतर्फे यात्रा काळात विविध कार्यक्रम होतील. गुरुवारी सकाळी सातला शासकीय महापूजा मान्यवरांच्या उपस्थितीत होईल, नंतर पोलीस ठाण्यातर्फे संत नामदेव महाराजांच्या समाधीसमोर आहेर केला जाणार आहे. यावेळी संस्थानचे विश्वस्त व भाविक उपस्थित राहतील.

२० मार्च शुक्रवार रोजी ग्राम प्रदक्षिणा होणार आहे तसेच आलेल्या दिंड्याचे स्वागत केले जाणार आहे रात्री हरिजागर होणार आहे. २१ मार्च शनिवार रोजी सकाळी ८ ते दुपारी दोन वाजेपर्यंत लाहींचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर आलेल्या दिंड्याचे प्रस्थान होणार आहे.

मिठासाठी यात्रा होती प्रसिद्ध
ही (Saint Namdev Yatra) यात्रा मिठाच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. धान्याच्या बदल्यात मीठ हे या यात्रेचे वैशिष्ट्य होते. पापमोचणी एकादशीला सुरू होणारी मिठाची यात्रा पंधरा दिवस चालत होती. यामध्ये राज्यासह अन्य राज्यांतून मीठ विक्रीसाठी आणले जात होते. परिसरातील शेतकरी, गावकरी बैलगाडीने यात्रेला घेऊन धान्याच्या बदल्यात वर्षभर पुरेल एवढे मीठ खरेदी करत होते. त्यातून मोठी उलाढाल होत होती. आता गावोगावी झालेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे बैलगाड्यांनी येणाऱ्यांची संख्या नगण्य झाली. आधुनिकतेत मिठाच्या साठवणुकीची परंपराही लोपली. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून मिठाची उलाढाल होलसेल’वरून किरकोळ’वर आली आहे.

भाविकांसाठी सुविधा
यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होणार आहेत. त्याशिवाय गुरुवारी रात्री परिसरातील पन्नास गावांतील दिंड्या दाखल होणार आहेत. भाविकांसाठी सोपी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कड़क उन्हाळा लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेवर भर देण्यात आला आहे. पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे, अशी माहिती संत नामदेव संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार यांनी सांगितले.

Related to this topic: